उमेश ढुमणे:
आपल्या देशात संविधान/लोकशाही आहे। डॉ। बाबासाहेबांनी सांगितलं आहे। संविधान कितीही चांगलं असो पण संविधान चालवणारे लोकं जर वाईट असतील तर आज जी परिस्थिती आहे ती झाल्याशिवाय राहणार नाही। आणि आपला देश जर संविधानानुसार चालला तर देशात एकही माणूस उपाशी राहणार नाही। म्हणून संविधान वाईट आहे असं कोणीही समजू नये। संविधान चालवणाऱ्या लोकांचा दोष आहे हे समजून घेऊ या।
स्त्री-पुरुष, गरीब-श्रीमंत, काळा-गोरा, जात-धर्म, एक समान, आपलं संविधान सांगतं। लोकांनी लोकांसाठी चालविलेले राज्य म्हणजे लोकशाही राज्य। आपल्या देशात आपण जो प्रतिनिधी निवडून देतो त्याच्या आधारे देश चालतो।
आपल्या देशात 6-7 वर्षांपूर्वी पेट्रोल चा दर 40 रुपयांपेक्षा खाली होता, आणि आज 111 रुपये, कंपन्यांच्या प्रत्येक वस्तूची किंमत वाढली आहे, मात्र शेतकऱ्यांच्या शेतमालाचा भाव व गरिबांच्या मजुरीत जराही वाढ होत नाही। माणसाला जगण्यासाठी लागणाऱ्या प्रत्येक गोष्टीची किंमत दिवसेंदिवस वाढत आहे मात्र कित्येक वर्षांपासून सर्वसामान्य माणूस आजही त्याच मजुरीत काम करत आहे व कष्ट करून पिकवलेल्या शेत मालाचा भाव ही वाढत नाही। मोठे उद्योगपती अरबपती होत चालले आहेत मात्र गरीब आणखीन गरीब होत चालला आहे। काही लोकांना तर दिवसातून दोन वेळेचे जेवण ही मिळत नाही आजही देशात ही परिस्थिती आहे। सर्वसामान्य माणसांचे सर्व रस्ते गुलामगिरी कडे जाताना का दिसत आहेत।
भूक, भीती आजून तिसरी एक गोष्ट या तीन गोष्टींच्या आधारे सरकार आपल्यांना गप्प बसवत आहे। कारण त्यांना माहिती आहे की माणूस भूक भागविण्यासाठी काहीही करू शकतो। जो परेंत या तीन गोष्टी आहेत तो परेंत आपण किती भरडलो जात आहोत याची जाणीव होत नाही।
आपल्या देशाला केवळ अंबानी, अदानी, मोठे उद्योगपती असे लोकं चालवतात मात्र आपल्या लोकशाही देशात लोकांनी निवडून आलेले प्रतिनिधी धाग्याने बांधलेल्या पुतळ्यासारखे उभे आहेत। गुलाम बनतात कारण, निवडणूक येते तेव्हा चोवीस तास जाहिराती दाखवल्या जातात। पाच-सहा सेकंदाच्या जाहिरातीला करोडो रुपये खर्च करावे लागतात आणि चोवीस तास जाहिराती साठी पैसे कुठून येतात। मोठ्या उद्योगपतींकडूनच।।। मग निवडून आल्यावर गुलाब बनतात।
संविधानात असलेले गरिबांच्या,आदिवासींच्या, शेतकऱ्यांच्या, मजुरांच्या, बहुजनांच्या हिताचे अनेक कायदे रद्द केले जात आहेत।
व बड्या कंपन्यांच्या, भांडवलदारांच्या, हिताचे कायदे आणले जात आहेत। या हक्क-अधिकारांसाठी, न्यायासाठी आवाज उठवणारा, सत्य परिस्थिती समोर आणणाऱ्याला, गरिबांचे प्रश्न मांडणाऱ्याला, आपल्या प्रश्नांची जाणीव करून देणाऱ्याला, संविधान टिकवून ठेवणाऱ्याला, न्यायाची बाजू मंडणाऱ्याला देश द्रोही च्या खटल्यात अटक केले जात आहेत, खून केले जात आहेत। लोकशाही असूनही हुकुमशाही चालवली जात आहे। तरीही हक्क-अधिकारासाठी , न्यायासाठी दाभोळकर, पानसरे यांनसारखे मोठ्या विचारांचे अनेक लोकं लढत आहेत। म्हणून आजून संविधान टिकवून ठेवले आहे।
रात्री रस्त्यावरून चालणाऱ्याला, प्लॅटफॉर्मवर झोपणाऱ्याला, टपरीवर सिगारेट पिणाऱ्याला, हेल्मेट न घलणाऱ्याला, इ। यांना पकडण्यासाठी पोलीस व्यवस्था वापरली जाते। मात्र क्रिमिनल, देशद्रोही देशाच्या खिलाप सजीश करत आहेत, विजय मल्ल्या, निरव मोदींसारखे कित्येक जण करोडो रुपये घेऊन देशातून फरार होतात, त्यांना पकडन्या ऐवजी गरिबांना वेठीला धरलं जात आहे। मोठ्या उद्योगपतींना कारोडोंनी कर्ज माफी केली जात आहे मात्र गरिबांना लाखों रुपयांच्या कर्जासाठी आत्महत्या करावी लागत आहे।
संविधान बुडविण्यासाठी अनेक संघ काम करत आहेत। संविधान वाईट आहे हेही पटवून दिले जात आहे। ज्या लोकांना मनुस्मृती हवी आहे असे अनेक गट संविधानाची टीका करत आहेत। जर संविधान टिकले नाही तर भारताचा सध्याचा अफगाणिस्तान होण्यासाठी वेळ लागणार नाही। गरीब-श्रीमंत, स्त्री-पुरुष, देशातील सर्व जाती-धर्मांना, भारतातील सर्व नागरिकांना संविधानात समान अधिकार आहेत। म्हणून संविधान टिकवायची आपली सर्व नागरिकांची जबाबदारी आहे।
आज आपल्या देशात –
- शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी लागणाऱ्या भांडवलाचा खर्च, बी-बियाणांचा खर्च कित्येक पटीने वाढत आहे मात्र शेतकऱ्यांनी पिकविलेल्या मलाचा भाव दिवसेंदिवस घसरत आहे, लाखो शेतकरी आत्महत्या करीत आहेत।
- मोठ्या मंदिरांठिकाणी, इतर ठिकाणी देशात करोडो भिकारी बघाला मिळतात।
- शाळा-कॉलेज ची फी भरता येत नाही म्हणून शिक्षण थांबत आहे, त्यातूनही पदवीधर होऊन ही करोडो युवक शिक्षण अडल्यामुळे व बेरोजगारीमुळे आत्महत्या करीत आहेत।
- महिलांवर दिवसेंदिवस बलात्कार होत आहे।
- अंबानींसारखे मोठे उद्योगपती 27 माळ्याच्या इमारतीत तर काहींना फाटक-तुटकं-ओल्या झोपडीत उपाशी झोपावं लागत आहे।
- मोठे उद्योगपती करोडो शेतकऱ्यांच्या लाखो हेक्टर जमिनी ओषाड पडून नावावर करीत आहेत तर काहींकडे राहत्या झोपडी-घराखालील एक गुंठा जमीनही नावावर नाही।
- देशातील आपलं सर्व हरवून बसलेले लोकं, विद्यार्थी, कष्टकरी, कामगार, दलित, आदिवासी, लाखो शेतकरी, नोकर वर्ग न्याय-हक्क-अधिकारासाठी लोक आंदोलने करीत आहेत।
- आपल्या देशात आशा कितीतरी समस्या आज दिसून येत आहेत।
म्हणून अन्याय करणाऱ्या गटांशी, हक्क-अधिकार- न्यायासाठी सरकारकडे प्रश्न विचारण्याची, आवाज उठविण्याची काळाची गरज आहे। या सर्व शोषणातून, गुलामी कडे जाण्यातून खरं स्वातंत्र्य हवं असेल तर गप्प राहून जमणार नाही।
माझं हे मत ऐकून काहींना असंही वाटेल की आपण एक दोघांनी बोलून काय फरक पडणार? परंतु कोणत्याही गोष्टीला एकापासूनच सुरुवात होते। आपल्या देशात संविधानाच्या आधी तर मनुस्मृती होती तेव्हा देशात कितीतरी असमानता होती, स्त्रियांवर, दलित, आदिवासी, वर्णव्यवस्थेमधील वरचे वर्ग खालच्या वर्गावर कितीतरी अन्याय-अत्याचार करत होते। खालच्या वर्गांना तर माणूस म्हणून ही जगता येत नव्हतं असं शेडयंत्र रचलेला होतं। आर.एस.एस. व ब्राम्हणवादी वर्गाला तर आजही संविधान नको आहे।
आज पेक्षा कितीतरी अन्याय अत्याचार होत होते। अश्या परिस्थितीत त्यावेळी महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ।बाबासाहेब आंबेडकर, आशा अनेक थोर क्रांतिकारकांनी ज्यांनी क्रांती घडवली त्यांनी आम्ही एक-दोघांच्या विचारांनी काय फरक पडणार आहे, असा विचार केला असता तर।।।? क्रांती घडली नसती। आपल्या देशात संविधान नसतं। एक दोघांच्या विचारांपासून फरक पडायला सुरुवात होते। आता तर संविधान आहे। घडविलेल्या क्रांतीच इतिहास आहे। म्हणून नकारात्मक विचार कारण अयोग्य ठरेल। सध्याच्या परिस्थितीत तुमच्या आमच्या विचारांनी आपला देश संविधानाच्या मार्गाने नेण्याची खूप गरज आहे।
संविधान मानणाऱ्या व माणूस कोणत्याही धर्म-जातीतला असो त्या प्रत्येक माणसाला माणूस म्हणून माणणाऱ्या सर्वांना झिंदाबाद, जय संविधान!
हिंदी अनुवाद:
आज के हालात पर मेरे विचार, पढ़ें और प्रतिक्रिया दें
हमारे देश में एक संविधान/लोकतंत्र है। डॉ. बाबासाहेब ने कहा है – संविधान कितना भी अच्छा क्यों न हो, संविधान को चलाने वाले बुरे हों, तो आज जैसी स्थिति है, वह नहीं रहेगी। अगर हमारा देश संविधान के अनुसार चलेगा तो देश में कोई भूखा नहीं रहेगा। इसलिए किसी को यह नहीं सोचना चाहिए कि संविधान खराब है। संविधान खराब नहीं है, यह संविधान लागू करने वालों की गलती है।
पुरुष और महिला, अमीर और गरीब, काले और गोरे, जाति और धर्म, संविधान के अनुसार सब एक समान हैं। जनता द्वारा जनता के लिए चलाया जाने वाला राज्य एक लोकतांत्रिक राज्य है। हमारे देश में हमारे द्वारा चुने गए प्रतिनिधियों द्वारा चलाया जाता है।
अपने देश में 6-7 वर्ष पहले तक पेट्रोल की दर 40 रु से भी कम थी, जो आज 111 रु है। एक व्यक्ति को जीवित रहने के लिए आवश्यक हर चीज की लागत दिन-ब-दिन बढ़ती जा रही है। खेती के लिए बीज-खाद कंपनियों के हाथों में है और कंपनियां अपने प्रोडक्ट की दर/कीमत दिन पे दिन बढ़ाती जा रही हैं। लेकिन किसानों के खेती के माल/उपज की कीमत और गरीबों, मज़दूरों के मज़दूरी की दर आज भी वही है। क्या यही समानता है? बड़े उद्योगपति तो अरबपति बन रहे हैं लेकिन गरीब और गरीब होते जा रहे हैं। कुछ लोगों को दो वक्त का खाना भी नहीं मिल पाता है। देश में अभी भी यही स्थिति है। आम आदमी के सारे रास्ते गुलामी की तरफ क्यों जाते दिख रहे हैं?
असलियत में हमारा देश अम्बानी, अदानी, बड़े उद्योगपतियों द्वारा ही चलाया जाता है। लेकिन हमारे लोकतांत्रिक देश में जनता के चुने हुए प्रतिनिधि धागे से बंधी मूर्ति की तरह खड़े हैं। वे गुलाम हो जाते हैं क्योंकि जब चुनाव आता है तो चौबीसों घंटे विज्ञापन दिखाए जाते हैं। पांच-छह सेकेंड के विज्ञापन में करोड़ों रुपए खर्च होते हैं और चौबीस घंटे के विज्ञापन के लिए पैसा कहां से आता है? बड़े उद्योगपतियों से ही… फिर जब वे चुने जाते हैं, तो वे इनहि उद्योगपतियों के गुलाम बन जाते हैं।
गरीबों, आदिवासियों, किसानों, मज़दूरों और जनता के हित में कई कानूनों को निरस्त किया जा रहा है। और बड़ी कंपनियों, पूंजीपतियों के हित में कानून लाए जा रहे हैं। इन अधिकारों के लिए आवाज़ उठाने वाले, सच्चाई को सामने लाने वाले, गरीबों के मुद्दे उठाने वाले, संविधान का पालन करने वाले, न्याय के लिए खड़े होने वालों को गिरफ्तार किया जा रहा है और गुंडागर्दी करने वाले मज़े से घूम रहे हैं। एक लोकतंत्र देश होने के बावजूद तानाशाही चल रही है। दाभोलकर और पानसरे जैसे कई बड़े दिमाग वाले निडर लोग, अधिकारों और न्याय के लिए लड़े, इसलिए ही संविधान पर चलना कुछ हद तक बरकरार है।
एक व्यक्ति रात में सड़क पर टहल रहा है, एक मंच पर सो रहा है, एक टपरी पर धूम्रपान कर रहा है, हेलमेट नहीं पहन रहा है, आदि। ऐसे छोटे लोगों को पकड़ने के लिए केवल पुलिस सिस्टम का इस्तेमाल किया जाता है। देश के खिलाफ साजिश रच रहे हैं अपराधी और विजय माल्या, नीरव मोदी जैसे कई लोग, देश की जनता के करोड़ों रुपये लेकर देश से भाग रहे हैं। ऐसे बड़े लोगों को कोई नहीं पकड़ता एक तरफ बड़े उद्योगपतियों को कर्ज़माफी दी जा रही है और दूसरी तरफ लाखों रुपये के कर्ज़ के लिए गरीबों को खुदकुशी करनी पड़ रही है।
संविधान को डुबाने के लिए कई टीमें काम कर रही हैं। यह भी साबित करने की कोशिश की जा रही है कि संविधान खराब है। मनुस्मृति चाहने वाले कई समूह संविधान की आलोचना कर रहे हैं। हमारे देश में संविधान से पहले जब मनुस्मृति थी, तब देश में बहुत असमानता थी, महिलाएं, दलित, आदिवासी, उच्च वर्ग जाति व्यवस्था में निम्न वर्गों के साथ बहुत अन्याय कर रहे थे। निम्न वर्ग मनुष्य के रूप में नहीं रह सके इसलिए यह जाति व्यवस्था का षडयंत्र रचा गया है। आरएसएस और ब्राह्मणवादी वर्ग आज भी संविधान नहीं चाहता है।
यदि संविधान नहीं बचा तो भारत को वर्तमान अफगानिस्तान बनने में देर नहीं लगेगी। अमीर और गरीब, पुरुष और महिला, देश में सभी जाति और धर्म, भारत के सभी नागरिकों को संविधान में समान अधिकार हैं। इसलिए संविधान की रक्षा करना हम सभी नागरिकों का दायित्व है।
आज हमारे देश में बहुत सारी समस्याएं हैं।
- खेती के लिए आवश्यक पूंजी की लागत, बीज-खाद-दवाई की लागत कई गुना बढ़ रही है लेकिन किसानों द्वारा उगाई गई उपज की कीमत दिन-ब-दिन गिरती जा रही है, लाखों किसान आत्महत्या कर रहे हैं।
- देश में बड़े मंदिरों और अन्य जगहों पर लाखों भिखारी देखे जा सकते हैं।
- स्कूल-कॉलेज की फीस का भुगतान नहीं होने से शिक्षा ठप है।
- आए दिन महिलाओं के साथ रेप हो रहा है।
- अंबानी जैसे बड़े उद्योगपति 27 मंजिला इमारतों में रह रहे हैं और कुछ तंग, गीली झोपड़ियों में भूखे मर रहे हैं।
- बड़े उद्योगपति करोड़ों किसानों की लाखों हेक्टेयर भूमि पर खेती कर रहे हैं, जबकि कुछ के पास अपनी झोपड़ियों के नीचे एक भी गुंठा जमीन नहीं है।
- देशभर में छात्र, मज़दूर, श्रमिक, दलित, आदिवासी, लाखों किसान, मज़दूर वर्ग के लोग न्याय और अधिकारों के लिए आंदोलन कर रहे हैं।
इसलिए, सरकार को सवाल पूछने चाहियेँ और अन्याय के खिलाफ आवाज़ उठानी चाहिए । इस सब शोषण से, गुलामी से, सच्ची आज़ादी चाहिए तो खामोश नहीं रह सकते।
मेरे विचार सुनकर कुछ लोग सोच सकते हैं कि हममें से कोई बोलेगा तो क्या फर्क पड़ेगा? लेकिन कुछ भी एक से शुरू होता है। ऐसे ही अगर महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब अंबेडकर, और उस समय क्रांति की शुरुआत करने वाले कई महान क्रांतिकारियों ने सोचा होता कि हम में से एक या दो के विचारों से क्या फर्क पड़ेगा…? तो क्रांति नहीं हुई होती। हमारे देश में कोई संविधान नहीं होता।
आज कई और ज्यादा अन्याय हो रहे हैं। वर्तमान परिस्थिति में हम सभी को अपने विचारों से हमारे देश को संविधान के पथ पर ले जाने की बहुत आवश्यकता है।
ज़िंदाबाद, जय संविधान !!
उन सभी को जो संविधान को मानते हैं और हर धर्म और जाति के व्यक्ति को इंसान मानते हैं!
फीचर्ड फोटो आभार: विकिमीडिया कॉमन्स; इंडिया टाइम्स